राजकीय

घडवू  अमुचा समर्थ भारत

पहलगामचा प्रतिशोध घेता, शांतिप्रिय नागरिक मनी हसे
घडवू  अमुचा समर्थ भारत हीच भावना मनी वसे ॥

असंतुलित अंतर्गत सत्तांभोवती
फिरते पाक आतंकनीती
सारी भारतद्वेषच जपती
छावण्यांसह तयांचे मिटवू ठसे ॥

जवानांत अमुच्या काय उणे
धैर्यापुढे त्यांच्या गगनही ठेंगणे
नका करु असे कोण म्हणे
श्वानांचे भुंकणे गजेंद्राच्या ध्यानी नसे ॥

इतिहासाची तुम्ही चाळा पाने
आक्रमणाची नसती निशाणे
प्रजारक्षणासाठीच लढणे
कुणी आक्रमिता परंतु उत्तर देऊ जशास तसे ॥

कुणी यास युद्धज्वर म्हणतील
शांतिपाठ पढतील, चर्चा झडतील
कलेसाठी अश्रुही ढासळतील
भक्षक रक्षक भेद ह्यांस ठाऊ नसे ॥

सत्यशोधाचा येथे उगम
विविध परंपरांचा तयात संगम
पूज्य येथे बुद्धही गौतम
विश्वशांतिचा खरा उद्घोष असे ॥

Written by: Madhav Kulkarni Source: madhavkblog.in

पृष्ठे: 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23

नमस्कार,

 माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या भोवती घडणाऱ्या घटनातून, अनुभवातून आपल्या सर्वांच्या मनात अनेक पडसाद, भावना उमटतात. त्या फक्त शब्दबद्ध करणे हा अल्पसा प्रयत्न आहे.  या प्रवासात आपण सहप्रवासी आहात याचा आनंद आहे. आपण आपली प्रतिक्रिया ब्लॉगवर जरूर नोंदवा.

नवविवाहित दांपत्याच्या स्वप्नांना अलगद उलगडत संसार सजवणारा दहा कवितांचा संग्रह आहे …. सुखचित्र नवे

.https://books2read.com/u/31AkzD